मराठवाड्यात पाणीटंचाई वाढतेय

मराठवाड्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण
मराठवाड्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषणतेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत ५ जानेवारीअखेर मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये ७ गावे व १०१ वाड्यांची भर पडली आहे. ६९७ गाव व २०२ वाड्यांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत असून, त्यासाठी प्रशासनाने ९०७ टॅंकरची सोय केली आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा बसताहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ४०२ गावे व १२८ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यासाठी ५४० टॅंकरची सोय करण्यात आली असून, २८९ विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील १९६ गावे व ७६ वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. त्यांची तहान भागविण्यासाठी २३० टॅंकरची सोय करण्यात आली असून, २८५ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जालना जिल्ह्यातील ८९ गावांना पाणीटंचाई भेडसावत असून, ३ वाड्यांनाही टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी जालना जिल्ह्यात १२६ टॅंकर सुरू केले असून, १४४ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, त्यासाठी ९ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. १६१ विहिरींचे जिल्ह्यात अधिग्रहण करण्यात आले असून, त्यापैकी ९ टॅंकरसाठी, तर १५२ टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील एक गाव व एका वाडीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी २ टॅंकर सुरू करण्यात आले असून, २ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात तूर्त टॅंकर सुरू नसला, तरीही विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित करण्यात आलेल्या २० ही विहिरी टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी उपयोगात येत आहेत. लातूर जिल्ह्यातही तीच स्थिती असून, जिल्ह्यात अधिग्रहित केलेल्या ४८ विहिरी टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी उपयोगात आणल्या जात आहेत. 

१५ लाख २२ हजार लोकांची तहान टॅंकरवर  मराठवाड्यातील १५ लाख २२ हजार ४६ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९ लाख ९ हजार ८१६, जालना जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ३४४, बीड जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार १६२, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ हजार १२४, तर नांदेड जिल्ह्यातील १२ हजार ६०० लोकांचा समावेश आहे. २ जानेवारीला १४ लाख ४ हजार ६३४ लोकांची तहान टॅंकरवर होती. त्यामध्ये तीन दिवसांत जवळपास १ लाख १७ हजार ४१२ लोकांची भर पडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com