साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई कायम

साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई कायम
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई कायम

सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाली. तरीही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. गेल्या महिन्यात अवघा एक टँकर कमी झाला आहे. माण, खटाव या दोन तालुक्यांतील ८२ गावे, ६२४ वाड्या-वस्त्यांवर १०१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे कराड, पाटण तालुक्यांत अनेक गावांत महापूर आला. त्यातून कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. मात्र माण, खटाव तालुक्यांत टंचाई असलेल्या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई कमी झाली नाही. 

गेल्या दोन दिवसांत या माण, खटाव, फलटण तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस होऊन पाणीटंचाई कमी झाली नाही. गेल्या महिन्याभरात एकूण टँकरच्या संख्येत अवघा एका टँकर कमी झाला. टँकर सुरू असलेल्या गावात अपेक्षित पाऊस होत नसल्यामुळे टंचाई परिस्थिती जैसे थे आहे. सध्या माण, खटाव व फलटण या तीन तालुक्‍यांतील ८२ गावे, ६२४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४३ हजार ९४१ जनतेस १०१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील ७१ गावे व ५६७ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ३५ हजार ४२ जनतेस ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

खटाव तालुक्‍यातील आठ गावे, ३९ वाड्या-वस्त्यांवरील ४९२१ ग्रामस्थांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. फलटण तालुक्‍यातील तीन गावे व १८ वाड्या-वस्त्यांना दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील ३७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३१, खटावमधील सहा विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com