खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली

खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली

जळगाव : खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून १० टक्केही साठा नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा, जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांतील प्रकल्प कोरडेठाक आहेत. धुळ्यात शिंदखेडा आणि धुळे तालुक्‍यात स्थिती बिकट आहे. नंदुरबारात नंदुरबार, नवापूर भागातील प्रकल्प कोरडे आहेत.

जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्‍यात सातपुडा पर्वतालगत सुकी, अभोरा व मंगरूळ प्रकल्पांत अनुक्रमे ६०, ६५ व ६० टक्के जलसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पातील साठा ३० टक्‍के आहे. चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या सीमेवरील अनेर प्रकल्पात सुमारे ५५ टक्के, चोपड्यातील गूळ प्रकल्पात ३० टक्केच साठा आहे. जामनेरातील तोंडापूर, पाचोऱ्यातील बहुळा, चाळीसगावमधील मन्याड, पारोळामधील बोरी, एरंडोलातील अंजनी हे प्रकल्प कोरडे आहेत. 

हिवरा व अग्नावती प्रकल्पातील साठा अनुक्रमे १५, ३० टक्केदेखील राहिलेला नाही. जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातील ३५, गिरणा प्रकल्पातील ३०, तर वाघूरमधील साठा २५ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. 

धुळे जिल्ह्यात करवंद, मालनगाव प्रकल्पातील साठा ४० टक्के, तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमधील साठा ५० टक्‍क्‍यांवर आहे. परंतु त्याचा शेतीसाठी उपयोग नाही. बुराई प्रकल्प कोरडा आहे. साक्री व धुळे तालुक्‍यांतील मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. पांझरा प्रकल्पातील साठाही ४० टक्‍क्‍यांखाली आहे. 

नंदुरबारमधील दरा प्रकल्प कोरडा आहे. तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये जलसाठा ५० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील एकूण साठा १० टक्‍क्‍यांखाली आला आहे. लहान तलाव, प्रकल्प कोरडे झाल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com