सातारा जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

सातारा जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
सातारा जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

सातारा : पाणीटंचाईमुळे तळ गाठलेल्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांत पावसाचा जोर वाढल्याने पाणी येऊ लागले आहे. सर्वच प्रमुख धरणांतील पाणीपातळी वाढू लागली आहे. मात्र ही पाणीपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमीच असल्याचे आकडेवाडीवरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे प्रमुख धरणांत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या वर्षी पावसाने उशिरा सुरवात केली असली तरी जून महिन्याची सरासरी पावसाने गाठली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 

धरण परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण कोयना १७५८, नवजा २००९ व महाबळेश्‍वर १८३७ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात २४ तासांत ३.६३ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना धरणात ३२.५० टीएमसी उपयुक्त तर एकूण ३७.६१५ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठा झालेला असून, सध्या धरणात प्रतिसेकंद ४३२८० क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणामध्ये ३२.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धोम धरणात २.२९, कण्हेर धरणात ४.१८, उरमोडी धरणात २.९७, तारळी धरणात ३.०४८ व धोम-बलकवडी धरणात १.५९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसावर धरणातील पाण्याचे चित्र स्पष्ट होते. यामुळे या दोन महिन्यांत किती पाऊस पडणार हे पाहावे लागणार आहे.

प्रमुख धरणांतील उपयुक्त पाण्याची टक्केवारी  कोयना : ३२.४५, धोम १९.६०, कण्हेर ४३.५७, धोम-बलकवडी ४०.१३, उरमोडी ३०.८०, तारळी ५२.२०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com