सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४० गावांमध्ये १३ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत टंचाई काहिशी उशिरा आणि कमी प्रमाणात जाणवत आहे. आता मॉन्सूनही अवघ्या काही दिवसांवर आल्याने ही टंचाईही संपण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात टंचाईच्या झळा दरवर्षी अधिक जाणवतात. गतवर्षी पावसाळी हंगामाच्या शेवटी चांगला पाऊस झाल्याने टंचाईच्या झळा कमी जाणवत आहेत. त्यातच जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धऱणातही यंदा शंभर टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळेही टंचाई तुलनेने कमी जाणवली. पण, आता जून महिन्यामध्ये टंचाई सुरु झाली. त्यातही दरवर्षी ठरलेल्या गावांचाच समावेश अधिक आहे.
प्रशासनाने टंचाईचे नियोजन केले आहे. मागणीप्रमाणे त्या-त्या गावाला टँकर दिला जाते आहे. तहसिल आणि प्रांतस्तरावर त्यासाठी सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ व सांगोल्यात प्रत्येकी एक, माढ्यात सहा आणि करमाळ्यात तीन असे १३ टँकर सुरु आहेत. या तालुक्यातील जवळपास ४० गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा होतो आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.