भंडारा जिल्ह्यातील ६२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर

भंडारा जिल्ह्यातील ६२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर
भंडारा जिल्ह्यातील ६२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ६२ गावांसाठी ५४ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी ही मंजुरी दिली असून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी ३० कोटी ८३ लक्ष निधी मंजूर केला आहे.          
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील २ वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. लोणीकर यांनी याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्र शासनाने सन २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे सन २०१८-१९ चा आराखडा तयार करण्यात आला.
या आराखड्यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व जवळपास १०० पेक्षा जास्त सरपंच या सर्वांनी सातत्याने पाणीपुरवठा योजनांची मागणी केली. या योजना राबविण्यासाठी एकूण २३ कोटी ४१ लक्ष रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे २ वर्षांच्या कालखंडानंतर या वर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मागील योजनांसाठी ३ कोटी १८ लक्ष  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा ७१ गावे-वाड्यांसाठी ६२ योजनांसाठी एकूण रु. २६ कोटी ५९ लक्षचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com