महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत आहे. लोकवस्त्यांवरील जलस्रोत आटल्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मंगळवार (ता. २१) पर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ७० लोकवस्त्यांवरील १ लाख १३ हजार ४३३ एवढ्या लोकसंख्येला ७५ टॅंकर पाणी पुरवित आहेत. टंचाईग्रस्त गावातील एकूण ३२९ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत आहे. लोकवस्त्यांवरील जलस्रोत आटल्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मंगळवार (ता. २१) पर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ७० लोकवस्त्यांवरील १ लाख १३ हजार ४३३ एवढ्या लोकसंख्येला ७५ टॅंकर पाणी पुरवित आहेत. टंचाईग्रस्त गावातील एकूण ३२९ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यंदाच्या मे महिन्यात जिल्ह्यतील तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहात आहे. उपसा वाढल्यामुळे जलाशये, विहिरी, कूपनलिका कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक २० टॅंकर असून, १७ लोकवस्त्यांना त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
परभणी तालुक्यातील दोन लोकवस्त्यांसाठी १ टॅंकर, जिंतूर तालुक्यात १६ लोकवस्त्यांसाठी १४ टॅंकर, सेलू तालुक्यात ९ लोकवस्त्यांसाठी १० टॅंकर, मानवत आणि सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी ५ लोकवस्त्यांसाठी ५ टॅंकर सुरू आहेत. गंगाखेड तालुक्यात ८ लोकवस्त्यांसाठी ९ टॅंकर आणि पूर्णा तालुक्यात ८ लोकवस्त्यांसाठी ११ टॅंकर सुरू आहेत.
७८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती...
पाणीटंचाई निवाणार्थ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध
उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ७८ गावांतील नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. १५ ठिकाणी तात्पुरत्या पूरक नळयोजना सुरू केल्या जात आहेत. ७१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ३२९ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
- 1 of 583
- ››