नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील पाणीटंचाईचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यातील ९९ गावे, ४६० वाड्या-वस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

दोन लाख २३ हजार ७०१ लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ११५ टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. ४९७ मिलिमीटर सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीटंचाईचे सावट जाणवू लागले आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेला. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील भूजलसाठ्यात घट झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्यात आले. टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या १७ वर्षांत २०१६ मध्ये सर्वांत जास्त ८२६ टॅंकर जिल्हाभरात सुरू होते. याद्वारे ५१६ गावे व दोन हजार वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र एक हजारांपुढे टॅंकर लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मंजुरीनंतर तत्काळ टॅंकर सुरू करण्यात येत आहेत.

टॅंकरची तालुकानिहाय संख्या
संगमनेर   २३
नगर
पारनेर २५
पाथर्डी ५३
शेवगाव १०
कोपरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com