हतनूर धरणक्षेत्रातील गावांना पाणीटंचाईतून दिलासा

हतनूर धरणक्षेत्रातील गावांना पाणीटंचाईतून दिलासा
हतनूर धरणक्षेत्रातील गावांना पाणीटंचाईतून दिलासा

भुसावळ, जि. जळगाव  : भुसावळ रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, भुसावळ, यावल, सावदा या मोठ्या नगरपालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसीसह तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर धरणात यंदा बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणात यंदा २९ टक्के अधिक जलसाठा आहे. यामुळे उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याची स्थिती आहे.  मुक्ताईनगर व भुसावळनजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरण क्षेत्रात या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. धरणात गतवर्षी पेक्षा अधिक जलसाठा आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी गावे आणि शहरे टंचाईमुक्त होणार आहे. गेल्या वर्षी हतनूर धरणात मार्च महिन्यात ४२  टक्के जलसाठा होता. यंदा मात्र सध्या धरणात ७० टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी टंचाईमुळे १३० गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अनेक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरणात उशिरापर्यंत आवक सुरू होती. यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत हतनूर धरणातून तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू होता. यामुळे भुसावळ पालिका, दीपनगर औष्णिक वीज केंद्र, भुसावळ रेल्वे, जळगाव एमायडिसी या तापी नदीवरील लहान बंधाऱ्यात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्त धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची गरज नाही.  धरणातील पाणीपातळी  हतनूर धरणात यंदा २१२.७३० मीटर पाणीपातळी आहे. तर १८१.५० द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा असून, याचे प्रमाण ७१.१८ टक्के इतके आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com