जळगावात टॅंकरची वाटचाल शंभरीकडे

जळगावात टॅंकरची वाटचाल शंभरीकडे
जळगावात टॅंकरची वाटचाल शंभरीकडे

जळगाव : जिल्ह्यात विविध गावांमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २०५ गावांमधील २१० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच ४६ गावांना तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला आहे. तसेच ३९ गावांत ७१ नवीन विंधन विहिरी घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. टॅंकरची संख्याही वाढत असून, त्यांची वाटचाल शंभरीकडे होत असल्याची स्थिती आहे. 

जमिनीची भूजल पातळीही खोल जात आहे. अमळनेर, पारोळा, जामनेर, बोदवड भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. मार्चमध्येच जिल्ह्यातील ९८ गावांना ७९ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक टॅंकर चाळीसगाव तालुक्‍यात असल्याचे समोर आले आहे.  

यंदा मार्चमध्येच तापमानाचा पारा चाळिशीवर गेला आहे. त्यामुळे आतापासूनच नागरिकांना पाणीटंचाईची भीषण समस्या सहन करावी लागत आहे. जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भूजल पातळीही खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईची झळ बसलेल्या गावांत जिल्हा प्रशासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

अमळनेर तालुक्‍यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक असून, ४० गावांमध्ये आता २ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतर चाळीसगाव तालुक्‍यातील २० गावांमध्ये २१ टॅंकर, तर पारोळ्यातील १५ गावांमध्ये १४ टॅंकर, जामनेर १०, भुसावळ ५, जळगाव २, मुक्ताईनगर १, बोदवड ३ आणि भडगावात २ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com