धोम-बलकवडीतून पाणी सोडले

यंदाच्या रब्बी हंगामासाठी वाई (जि. सातारा) तालुक्यातील धोम-बलकवडी धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन गुरुवारी (ता. १०) सोडण्यात आले. यामुळे भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाआहे.
धोम-बलकवडीतून पाणी सोडले Water was released from Dhom-Balkwadi
धोम-बलकवडीतून पाणी सोडले Water was released from Dhom-Balkwadi

भोर, जि. पुणे : यंदाच्या रब्बी हंगामासाठी वाई (जि. सातारा) तालुक्यातील धोम-बलकवडी धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन गुरुवारी (ता. १०) सोडण्यात आले. यामुळे भोर तालुक्यातील वीसगाव खोरे व चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यानंतर त्याला पाण्याची गरज होती. म्हणून शेतकऱ्यांनी धोम-बलकवडी धरण प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केला होती. त्यास प्रतिसाद देत सातारा सिंचन विभाग प्रशासनाने गुरुवारी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली. कालव्यातून पाणी सोडल्यामुळे भोरच्या वीसगाव व चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना व ओढ्यानाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.  भोर तालुक्यातील १ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा व ज्वारी आदी पिंकाना फायदा होणार आहे. त्यामुळे वीसगाव खोऱ्यातील प्रमुख गाव नेरे व चाळीगाव खोऱ्यातील आंबवडे गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र कालव्यात काही ठिकाणी गळती होत असल्यामुळे कालव्यातून पाणी सोडल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. गळतीमधून हजारो लीटर पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्यामुळे शेतीची तळी बनली आहेत. त्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. कालव्यास अस्तरीकरण करून देखील पाण्याची गळती सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com