'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'

लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे :साईनाथ घोरपडे
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'

नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी स्वराज्य रक्षक संघर्ष समितीचे समन्वयक साईनाथ घोरपडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात घोरपडे यांनी म्हटले आहे, की आजही मोठ्या प्रमाणावर उद्योग- व्यवसाय सुरू झालेले नाहीत. कोरोना संकटाच्या काळात सर्वांत जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले. बाजार समित्या बंद असल्यामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. शेतमाल तसाच शेतात सडून गेला. अशा स्थितीत, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना रक्कम भरणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे दोन वर्षांपर्यंतचे कर्जावरील व्याज माफ करावे. कांद्यालाही हमी भाव द्यावा. शेतमजूर, बांधकाम कामगारांसाख्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना जेवणाची व्यवस्था करावी. सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमहिना दीड हजार रुपये भत्ता द्यावा. शहरी भागातील मध्यमवर्गीय नागरिकांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे आणि एका वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपर्यंतचे वीजबिल माफ करावे, तसेच त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com