आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले : फडणवीस

आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले : फडणवीस
आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले : फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जे ठरले आहे, त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महायुतीचे सरकार निवडून दिल्याबद्दल सर्वप्रथम राज्यातील जनतेचे आभार मानले. पुढचे सरकार महायुतीचे होणार याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही २६० जागा लढलो होतो, त्यापैकी १२२ जागा आम्हाला मिळाल्या होत्या. 

या वेळी भाजप स्वतः १५० जागांवर आणि मित्रपक्षांचे उमेदवार १४ जागांवर उभे होते. गेल्याच्या तुलनेत आम्ही या वेळी जागा कमी लढवल्या होत्या, त्यामुळे जागाही कमी मिळाल्या आहेत. मात्र, सर्वाधिक स्ट्राईक रेट हा महायुतीचा आहे. या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन आम्हाला मिळाले आहे, राज्याच्या सर्वच भागात आमची कामगिरी चांगली राहिली आहे. 

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि परळीच्या निकालाचा आम्हालाही धक्का बसला आहे. त्याचे विश्लेषण आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच दोन्ही पक्षांत या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. त्याचा फटकाही आम्हाला बसला आहे. 

अपक्ष निवडून आलेल्या १५ लोकांशी आतापर्यंत माझे बोलणे झाले आहे. ते आमच्यासोबत येणार आहेत. निवडणुकीत विरोधी पक्षांना काही जागा निश्चित वाढवून मिळाल्या आहेत. पण विरोधक प्रबळ झाला असे वाटत नाही, असे सांगतानाच विरोधी पक्षदेखील सक्षमपणे काम करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com