नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात असून दिवसेंदिवस उपजीविकेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. केवळ अन्नधान्य पुरवठा करून पुरेसे होणार नाही. तर नागरिकांच्या हाताला काम मिळण्याची गरज आहे. त्यामुळे ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी सर्वांना उपाययोजनांसोबत त्यांच्या अंमलबजावणीसाठी निरंतर सक्रिय रहावे लागेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. ११) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिरीष कोतवाल, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सीमंतिनी कोकाटे, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, की राज्य आणि त्यापाठोपाठ जिल्हा आणि प्रत्येक गावाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सर्वत्र नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने आपल्या सर्वांची आहे. तसेच ‘मिशन बिगेन अगेन’ मागची भूमिका तळागाळात पोचवावी लागेल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.