नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ 

जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. मात्र तुलनेत पश्‍चिम भागात पर्जन्यमान अधिक असताना यंदा पाऊस कमी आहे.
Wells reached the bottom in Nashik district
Wells reached the bottom in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. मात्र तुलनेत पश्‍चिम भागात पर्जन्यमान अधिक असताना यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळे या भागात एक मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. तर उत्तरपूर्व भागात चालू वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याची स्थिती असली तरी उपसा वाढल्याने अनेक भागात विहिरींनी तळ गाठला आहे. 

भूजल सर्वेक्षण विभाग यांच्या वतीने माॅन्सून पश्‍चात भूजल पातळीच्या नोंदी ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आल्या. त्यामध्ये दिंडोरी, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात चालू वर्षी घट दिसून आली आहे. तर टंचाईग्रस्त बागलाण, चांदवड, कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, सिन्नर, सुरगाणा व येवला येथे भूजलपातळीमध्ये वाढ दिसून आली आहे. मात्र डिसेंबरनंतर पाणी उपसा वाढला आहे. त्यामुळे हळूहळू विहिरी खोल जाण्यास सुरुवात झाली. तर आता ज्या भागात भूजल पातळी वाढली होती. या भागातही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. 

पूर्व भागात जे पाण्याची टंचाईग्रस्त तालुके होते. या भागात गतवर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे आता उशिरा टंचाई भासत आहे. मात्र याउलट आता काही भागांमध्ये किंवा गटांमध्ये खडकाळ भाग असल्याने स्थानिक भौगोलिक परिस्थिती नुसार पाणीपातळी टिकून राहत नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. 

तालुकानिहाय भूजलपातळी (ऑक्टोबर २०२० अखेर) 
सटाणा ०.४० मीटर वाढ
चांदवड २.६२ मीटर वाढ
देवळा २.१३ मीटर वाढ
दिंडोरी ०.५३ मीटर वाढ
इगतपुरी ०.४९ मीटर वाढ
कळवण ०.४७ मीटर वाढ 
मालेगाव १.४९ मीटर वाढ 
नांदगाव १.९८ मीटर वाढ 
नाशिक ०.५७ मीटर वाढ 
निफाड ०.८८ मीटर वाढ 
पेठ ०.७० मीटर वाढ 
सिन्नर १.५२ मीटर वाढ 
सुरगाणा ०.३६ मीटर वाढ 
त्र्यंबकेश्‍वर ०.७५ मीटर वाढ 
येवला २.३८ मी. वाढ 

समाधानकारक पर्जन्यमान मात्र वापरात वाढ  पाण्याची टंचाई जाणवत असलेल्या उत्तरपूर्व भागात ज्यामध्ये सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यांत पाऊस समाधानकारक होता. परिणामी रब्बी हंगामात बागायती क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने विहिरींनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे काही भागांत पाण्याअभावी पिकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होत आहे. 

आणि गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे साहजिक पीकपद्धती किंवा जास्त पाणी लागणारे आणि पाणीउपसा वाढून तत्काळ पाणीपातळी खोल जाते. त्यामुळे ही टंचाई परिस्थिती निर्माण होते. आगामी काळात पाणी जपून वापरावे लागणार आहे. पिकासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. तर इतर वापरासाठी अचूक नियोजन करून अपव्यय टाळावा.  - जीवन बेडवाल, उपसंचालक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com