सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कधी?

सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकासह द्राक्ष, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी करणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
When is the panchnama of damaged crops in Sangli district?
When is the panchnama of damaged crops in Sangli district?

सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकासह द्राक्ष, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी करणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता.३) पावसाने उघडीप दिली. परंतु जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव तालुक्यात पुन्हा शनिवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हरभरा पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. अगोदर महापुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता या मॉन्सूनोत्तर पावसाने रब्बी हंगामातील पिकाला देखील फटका बसू लागला आहे.

अजूनही शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात द्राक्षाचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हरभरादेखील पावसामुळे बाधित झाला आहे. सखल भागातील शेतात पाणी साचल्याने हरभरा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कधी सुरू होणार, असा प्रश्‍न आहे.

कृषी विभागाकडून पाहणी

जिल्‍ह्यात या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कृषी विभागाने पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान आहे. तर काही प्रमाणात डाळिंबालाही फटका बसला आहे. तर हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे. सध्या किती क्षेत्रावरील हरभरा बाधित झाला आहे, ते सांगणे कठीण आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकांचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.

जिल्ह्यात झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. पंचनामे करण्याचे आदेश आल्यानंतर तातडीने पंचनामे केले जातील. - मनोजकुमार वेताळ, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com