जळगाव जिल्ह्यात केळी नुकसानीचे पंचनामे होणार कधी?

जळगाव जिल्ह्यात केळी नुकसानीचे पंचनामे होणार कधी?
जळगाव जिल्ह्यात केळी नुकसानीचे पंचनामे होणार कधी?

जळगाव : तापी व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे मुक्ताईनगर (जि. जळगाव) जवळील हतनूर धरणाचे बॅक वॉटर शिवारातील केळी बागेत घुसल्यामुळे तालुक्‍यातील सुमारे सातशे ते आठशे एकर केळी पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाने जी जमीन हतनूर प्रकल्पासाठी संपादित केली आहे, त्या जमिनीवरील पिकांच्या नुकसानीसंबंधी कोणतेही पंचनामे केले जाणार नाहीत, असे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  मागील दोन दिवस तापी हतनूर धरणाचे बॅक वॉटर शेतीशिवारात शिरल्यामुळे रावेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील विटवा, निंबोल, ऐनपूर, अजनाड, नेहेते, खिरवड, निंभोरासीम आदी गावांतील शेतीशिवारातील केळी पीक पाण्याखाली आले होते. यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. सध्या पुराचे पाणी ओसरले आहे; पण या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील केळीसह पेरू बागांचेही नुकसान झाले. प्रशासनाने जे क्षेत्र हतनूर प्रकल्पासाठी संपादित केलेले नाही, त्यातील पिकांचेच पंचनामे केले जातील, असे म्हटले आहे; परंतु किती क्षेत्र संपादित केलेले नाही, किती संपादित केले आहे, कुणाच्या शेताचे पंचनामे करायचे यासंबंधीची ठोस माहितीदेखील प्रशासनाने जारी केलेली नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी संभ्रमात आहेत. त्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com