अंकुशनगर, जि. जालना ः यंदा टरबूजाला मिळत असलेल्या ठोक विक्रीतील कवडीमोल दरामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते आहे.
शेतकरी महेश मांगदरे हे दरवर्षी ३ एकर टरबूज पीक घेतात. त्यांना आतापर्यंत एकरी २५ हजार रुपये खर्च येतो व उत्पन्न एकरी सव्वा लाख रुपये येत होते. तीन एकरांत ६० टन उत्पन्न होत होते व भाव ७ ते ८ रुपये लागत होता. त्यांना ३ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न होत होते. यात निव्वळ नफा हा ३ लाख राहत होता.
श्री. मांगदरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टरबूज पीक घेतले. प्रत्येक वर्षी टरबुजाला किलोला ९ ते १० रुपये भाव मिळत असतांना ‘कोरोना’च्या प्रकोपात व्यापारी बाजार पेठ बंद व संचार बंदी असल्याने यंदा टरबूजाला किलोला साडे तीन रुपये भाव मिळाला.
त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरी पणामुळे अवकाळी पाऊस झाल्यानेही यंदा थोड्या फार प्रमाणात उत्पन्न ही घटले असून भाव ही कमी लागला. त्यामुळे फक्त टरबूज लागवड व मेहनतीचा खर्च निघाला आहे. शिवाय व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी करून तेच टरबूज चढ्या भावाने विकत असल्याची स्थिती असल्याचे ते म्हणाले.
गेल्या चार पाच वर्षांपासून टरबूज पीक घेतो. मात्र, यावर्षी सारखा फटका मला कधीच बसला नाही. ‘कोरोना’मुळे हा फटका बसला असून कवडीमोल भावाने व्यापाऱ्याला टरबूज दिले. फक्त मेहनत हाती लागली. फायदा मात्र शून्य. एका एकरात उत्पन्न यंदा तीन एकरात झाले. - महेश मांगदरे, शेतकरी, वडीगोद्री, जि. जालना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.