लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का नाही? ः राजू शेट्टी

लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का नाही? ः राजू शेट्टी
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का नाही? ः राजू शेट्टी

औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण मोडीत निघालंय. सरकार मात्र स्वस्थ बसलं. लष्करी अळीनं मका पीक उद्ध्वस्त केलं. सोयाबीन, बाजरी इतर कोणतंही पीक या अळीच्या तावडीतून सुटणार नाही, असं तज्ज्ञ सांगत आहेत. मग हे आक्रमण वाढेपर्यंत कृषी विद्यापीठे, कृषी खातं, तज्ज्ञ काय करीत होते. अजून झालेल्या नुकसानीचे पंचनामे का नाही,’’ असा घणाघाती सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

औरंगाबाद विभागीय आयुक्‍तालयावर सोमवारी (ता. १६) श्री शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवा आदींच्या प्रश्नांवर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. त्या वेळी श्री. शेट्टी बोलत होते. 

दुष्काळात विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्याऐवजी विमा कंपन्याच गब्बर झाल्या. पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना फसवले. हे घडले केवळ कंपन्यांना पैसे मिळावेत, हे धोरण स्वीकारल्याने. अज्ञानी असणे गुन्हा नाही, त्याचा फायदा घेतला जातो, याचा राग येतो. शेतकरी, शेतमजुरांची गळचेपी होते आहे. दोन कोटी रोजगाराचे काय झाले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. वेळीच सावध व्हावे नाहीतर आक्रोशाचा हायड्रोजन बॉंब फुटल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघातही शेट्टी यांनी सरकारवर केला. 

प्रास्ताविक गजानन पाटील बंगाळे यांनी केले. या वेळी स्वाभिमानीच्या पूजा मोरे, अश्विनी आंधळे, पूजा पाटील, परमेश्वर इंगोले, कृष्णा भिसे यांनी विचार मांडले. मुस्कटदाबीला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे स्पष्ट करण्यात आले. आक्रोश मोर्चाने दणाणले औरंगाबाद शहर.. पहा video आक्रोश मोर्चानंतर बोलताना राजू शेट्टी.. पहा video

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com