तिसंगी तलावात पाणी सोडणार : जलसंपदामंत्री महाजन

तिसंगी तलावात पाणी सोडणार : जलसंपदामंत्री महाजन
तिसंगी तलावात पाणी सोडणार : जलसंपदामंत्री महाजन

सोलूापर : तिसंगी-सोनके तलावात पाणी सोडण्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गणपतराव देशमुख, सरपंच दीपक चंदनशिवे यांची बैठक झाली. महाजन यांनी अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाबाबत पेच निर्माण झाला आहे. 

गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. अद्यापपर्यंत एकही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे तिसंगी तलावात पाणी सोडण्याची मागणी होते आहे. पण, प्रशासन मंत्र्यांकडे बोट दाखवत असमर्थता दाखवत आहे. 

सांगोल्याचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी यामध्ये पुढाकार  घेतला. महाजन यांची बुधवारी (ता. २८) सायंकाळी मुंबईत भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत मागणी केली. त्यानंतर त्यांनीही तसे आश्‍वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण, प्रत्यक्ष पाणी सुटत नाही, तोवर माघार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता नवीनच पेच निर्माण झाला आहे. संतोष पाटील, पांडुरंग हाके यांची प्रकृती खालावत आहे. पाणी सोडल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com