सांगली : खरीप हंगामासाठी बियाणे, खते वेळेत मिळणार का?

कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातूनही खरीप हंगाम पेरणीसाठी पैशांची तरतूद केली आहे. परंतू, सोयाबीनचे बियाणे कमी आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दर जादा सांगत आहेत. उसाचे बिल पूर्ण मिळालेले नाही. त्यामुळे हंगामात पैशाची अडचण भासणार आहे. कारखान्याने रक्कम अदा करावी. - तात्यासो नागावे,खटाव, ता. पलूस
Will seeds and fertilizers be available in time for kharif season in Sangli district?
Will seeds and fertilizers be available in time for kharif season in Sangli district?

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामासाठीची तयारी केली आहे. तरीही हंगामात आर्थिक अडचणींमुळे बियाणे, खते, वेळेत मिळणार का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सरासरी ३ लाख ४८ हजार हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले. जिल्ह्यात वारणा, कृष्णा नदीकाठासह बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होतो. शिराळा तालुक्‍यात भात पिकाचे क्षेत्र अधिक असते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाही हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. अनेक भागात मशागती पूर्ण झाल्या आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे.  कृषी विभागाने ५२ हजार ८५३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली आहे. खतांची १ लाख २९ हजार मेट्रिक टन मागणी केली आहे. शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे देण्याचे नियोजन कृषी विभाग करु लागला आहे. 

गेल्यावर्षी महापूर, यंदा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरवातीच्या काळात बाजार पेठा सुरु नसल्याने शेत माल विक्री करता आला नाही. त्यात कारखान्याचे गाळप संपले आहे. शेतकऱ्यांची बिले अदा केलेली नाहीत. त्यातच द्राक्षाचे पैसे व्यापाऱ्यांकडेच अडकले आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. ते देखील मिळालेले नाही. सध्या पीक कर्जाचे वाटप सुरु असले, तरी अनेक शेतकऱ्यांना त्या पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.  भाजीपाला लागवडीसाठी, ऊस पिकासाठी कृषी निविष्ठा केंद्राकडून, बियाणे, खते उधारीवर खरेदी केली होती. बिले आल्यानंतर पैसे अदा केला जाणार होते. परंतू, सर्वबाजूंनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्राची उधारी जमा करता आली नाही. परिणामी, खरीप हंगामात लागणारी बियाणे, खते उधारीवर मिळणे कठीण झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com