मुंबई ः एखाद्या चौकशी करणाऱ्या संस्थेने कुठल्या काळातील कागदपत्रे मागवावीत हा त्यांचा अधिकार आहे. ‘ईडी’ने कागदपत्रे मागितली तर ती सादर करणे संबंधितांचे काम आहे. याबाबत कृषिमंत्र्यांशी बोलणार होतो, पण त्यांना कोरोना झाला आहे. असे काही झाले आहे का, याबाबत आज संबंधित सचिवांकडून माहिती घेणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी ठिबक घोटाळ्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना दिली.
‘‘केंद्राकडून अतिवृष्टी अवकाळीसाठी अजून मदत आलेली नाही. अतिवृष्टीतील मदतीसाठी १० हजार कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले होते. त्यातील २ हजार कोटी द्यायचे राहिले होते, ते आजच दिल्याचे सांगतानाच ही रक्कम कर्ज काढून दिली आहे. त्यामुळे आधीच्या निधीचे वितरण झाल्यानंतर आम्ही पुढील रक्कम दिली. अन्यथा, व्याजाचा भुर्दंड पडतो,’’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘‘ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत हे कधी कळत नाही. कारण तिथे कुठल्याच पक्षाचे चिन्ह नसते. जे निवडून येतात ते सांगतात आम्ही तुमच्याच पक्षाचे आणि काम करून घेतात. असे सांगतानाच मी ३० वर्षं ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलोय. आमच्या इथेही दोन गट उभे राहतात. जे निवडून येतात ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच,’’ अशी कोपरखळीही अजित पवार यांनी केली.
केंद्राकडे जीएसटीची कालपर्यंतची थकबाकी २६ हजार कोटींची आहे. मात्र दर आठवड्याला आता पैसे यायला लागले आहेत, असेही मंत्री पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार म्हणाले...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.