रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल का?

चिपळूण तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथील भातासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचमाने करण्याचे काम सुरू आहे; मात्र त्यात नुकसानीची टक्केवारी व पावसाचा कालावधी या निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळेल का, हा प्रश्‍न आहे.
Will there be compensation for crop loss in Ratnagiri?
Will there be compensation for crop loss in Ratnagiri?

चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथील भातासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचमाने करण्याचे काम सुरू आहे; मात्र त्यात नुकसानीची टक्केवारी व पावसाचा कालावधी या निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळेल का, हा प्रश्‍न आहे.

तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने काबाडकष्ट करून पिकविलेला आणि हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शासनाने मदतीचा हात म्हणून पंचनामे सुरू केले आहेत. तलाठी, ग्रामसेवक पंचनामा करत आहेत. १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने किमान ३३ टक्के नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा केला जात आहे. त्यामुळे केवळ भुईसपाट झालेल्या पिकांचा समावेश होत आहे. प्रत्यक्ष नुकसान व झालेला पंचमाना यामध्ये तफावत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पोफळी भागातील बहुतांशी शेती डोंगर उताराची असून कोरडवाहू शेती पावसावर अवलंबून आहे. केवळ खरीप हंगामातील पिके घेतली जातात.

चालू वर्षी पावसाच्या लहरीपणाची कामे खोळंबली आहे. तर मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली. त्यातच करपासदृश्य रोगाची भर पडली. त्यातून उरलेले पीक पतीच्या पावसाने झोडपून काढल्याने उत्पन्न घटणार आहे. काही ठिकाणी उत्पादन खर्चही निघणे अवघड आहे. केवळ जमिनदोस्त पिकाचा पंचनामा होत आहे. काढणी केलेल्या पिकाचे पंचनामे केले जात नाही. काढणी केलेल्या पिकाचे पंचनामे करण्याबाबत शासनाकडून अद्याप आदेश नाहीत.

पिके पावसाने झोडपल्याने जागेवरच झडून गेली आहेत. त्याचा पंचनामा होत नाही. १० ते १४ ऑक्टोबर व्यतिरिक्त काढणी केलेले किंवा काढणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे केले जात नाहीत. पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३३ टक्के नुकसानीचा निकष शेतकऱ्यांना पटवून सांगता येत नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

सध्या १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीचे पंचनामे सुरू आहे. एकूण पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार पंचनाम्याची कार्यवाही केली जात आहे. - तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com