कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ

कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ
कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ

कोल्हापूर : जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा तडाखा बसत आहे. बुधवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत बहुतांशी तालुक्‍याला पावसाने झोडपून काढले. सरासरी १५ ते ४० मिलिमीटरपर्यंत पाऊस जिल्ह्यात विविध ठिकाणी पडत होता.

जोरदार सरींनी काही ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले. सुसाट वाऱ्यामुळे उसाबरोबर भाताचे पीक ही काही ठिकाणी आडवे झाल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला.

चंदगड, आजरा, गडहिंग्लज, पन्हाळ्यासह शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, राधानगरी तालुक्‍यांत पावसाने जोरदार तडाखा दिला. सध्या भाताची पिके काढणीच्या अवस्थेत येत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे पीक आडवे झाले. त्यातच पाणी साचून राहिल्याने हे कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूर्ण वाढ झालेला ऊसही अनेक ठिकाणी पडून नुकसानीचा धोका आहे.

आणखी पाऊस झाल्यास नुकसान वाढण्याची शक्‍यता आहे. माळरानावरील पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार असला तरी आडव्या पिकांना मात्र नुकसानीचा ठरला आहे. सोयाबीन काढणी हंगाम सुरू असल्याने धावपळ उडाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com