कोल्हापुरात ऊन-पावसाचा खेळ

कोल्हापुरात ऊन-पावसाचा खेळ
कोल्हापुरात ऊन-पावसाचा खेळ

कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी एक दोन तास जोरदार पाऊस, असे चक्र सुरू आहे. अशा वातावरणामुळे शेतातील कामाचे चक्र बिघडत आहे. 

जिल्ह्यात दोनदा पूर येऊन गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या भागात पूर नव्हता, त्या भागातील खरीप पिके पक्वतेकडे जात आहेत. पण सध्या निर्माण होणारे हवामान या पिकाच्या वाढीसाठी अडथळे निर्माण करत असल्याची स्थिती आहे.

दोन दिवसांत उन्हाळ्यासारखे ऊन पडले. प्रचंड उष्म्यामुळे खरीप पिकांना रोग किडीचा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली. यातच पुन्हा रात्री वळवासारखा पाऊस पडून शेतात पाणी साचून राहिले. खरीप पिकांच्या वाढीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. पावसामुळे पिकांतील मशागतींनाही अडथळे निर्माण होत आहे. 

कोणतेच वातावरण सलग नसल्याने शेतकामाचे नियोजन करणे अवघड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा पावसाची शक्‍यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडल्याचे चित्र आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com