परभणीत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.५) केलेल्या बेकायदेशीर कृत्यांच्या निषेधार्थ कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता.६) काळ्या फिती लावून कामकाज केले. संबंधीतावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आली.
मांडाखळी आणि जांब येथील संत्रा नुकसानीच्या पंचनाम्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेले. निवेदन घेण्यास हजर नसल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांच्या खुर्चीला चप्पालांचा हार घालून, टेबलवर संत्री टाकून धुडगुस घातला. फळपीक विमा पंचनामे करण्याचा बेकायदेशीर हट्ट धरुन कार्यालयीन कामकाजाचा खोळंबा केला.
हवामान आधारित फळपीक विमा योजना (अंबियाबहार) २०१९-२० मधील तरतुदीनुसार अधिसूचित मंडळातील पीक निहाय क्षेत्र, हवामान प्रमाणकांशी सांगड घालून नुकसान भरपाई ठरविण्यात येते. संत्रा पीकांचा विमा संरक्षित कालावधी ३१ मे रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर नुकसान भरपाई ठरविण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येईल. हे माहित असतानाही प्रसिध्दीच्या हव्यासापोटी केलेल्या गैरकृत्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.