`रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधाऱ्यांची कामे निधीअभावी रखडली`

`रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधाऱ्यांची कामे निधीअभावी रखडली`
`रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधाऱ्यांची कामे निधीअभावी रखडली`

रत्नागिरी : ‘‘जिल्ह्यात अनेक पाटबंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र निधीच्या अभावामुळे अनेक प्रकल्पांच्या कामांना ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील १७ पाटबंधाऱ्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु यासाठी सुमारे ४७ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे,’’ असे  कोकण पाटबंधारे विकास मंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे यांनी खेड येथे सांगितले. 

आंब्रे म्हणाले, ‘‘प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी देणे शासनाने बंद केले असले, तरी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे या पुढे जिल्हा नियोजन निधीतून अशा कामांसाठी निधी देण्यात येईल. उपलब्धता होताच प्रलंबित कामांना सुरुवात केली जाईल. जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने एकूण ८८ प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यापैकी ७१ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये ६ लघू, १ मध्यम, तर ९ कोल्हापुरी प्रकारचे आहेत. ८८ पैकी १७ प्रकल्पांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यासाठीच ४७ कोटी ३० लाखांचा निधी आवश्यक आहे.’’ 

‘‘जिल्ह्यातील प्रकल्पांच्या दुरुस्तीवर आतापर्यंत ३ कोटी रुपयांच्या निधीचा खर्च करण्यात आला. १७ प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाहीत. शासनाच्या नव्या धोरणांनुसार प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल. त्यामुळे कोकणात रखडलेल्या प्रकल्पांची कामे मार्गी लागतील,’’ असेही त्यांनी सांगितले.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाबाबत आंब्रे म्हणाले, ‘‘तिवरे दुर्घटना निश्‍चितच दुर्दैवी आहे. मात्र या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व धरणांचे ऑडिट करण्यात आले आहे. यानुसार काही धरणाची तत्काळ दुरुस्ती हाती घेणे गरजेचे आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com