कांदळवनाचा विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू
कांदळवनाचा विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू

कांदळवनाचा विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू

चिपळूण, जि. रत्नागिरी : जिल्ह्यातील १४३२ हेक्‍टर क्षेत्र कांदळवन वनाला राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये समाविष्ट झालेल्या गावांचे सूक्ष्म आराखडे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. 

चिपळूण परिक्षेत्राचे वनाधिकारी सचिन निलख यांनी याबाबत माहिती दिली. या बाबतची सूचना महसूल व वनविभागाकडून काढण्यात आली असून, लवकरच या गावांमधील विकासकामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यातील ३० हजार हेक्‍टर क्षेत्रात कांदळवने असल्याचे आढळून येते. समुद्र आणि वादळी आपत्तींपासून किनारपट्टीचे कांदळवनामुळे संरक्षण होते. 

कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन त्याला पुरेसे वैज्ञानिक पद्धतीचे संरक्षण द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या पार्श्‍वभूमीवर किनारी प्रदेशाचे वादळापासून कांदळवनामुळे संरक्षण होते. मासे, खेकडे आदी जलचरांना आसरा मिळतो. किनारी भागातील जैवविविधता टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. यासाठीच कांदळवन सहव्यवस्थापन समिती निर्माण योजना राबवण्याबाबत शासनाचा विचाराधीन आहे. यास अनुसरून शासनाने राखीव वनांचा निर्णय घेतले आहे. 

या गावांचा समावेश

रत्नागिरी जिल्ह्यात राखीव वनक्षेत्र असलेल्या एकूण ९५ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यात चिपळूण तालुक्‍यातील चिवेली, गांग्रई, लोणारी, चिवेली बंदर, मालदोली, वाघिवरे आदी गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com