तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली 

राज्य तलाठी संघटनेच्या अध्यक्षांनी टाकलेल्या एका मॅसेजवर राज्य समन्वयक विभागाचे जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करत गेल्या दहा दिवसांपासून राज्यभर तलाठ्यांनी संप सुरू केला आहे.
The work was hampered by the demise of the Talathas
The work was hampered by the demise of the Talathas

नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय ठेवण्यासाठी असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज्य तलाठी संघटनेच्या अध्यक्षांनी टाकलेल्या एका मॅसेजवर राज्य समन्वयक विभागाचे जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करत गेल्या दहा दिवसांपासून राज्यभर तलाठ्यांनी संप सुरू केला आहे. 

या संपात राज्यभरातील सुमारे साडेबारा हजार तलाठी सहभागी झाले आहेत. या संपामुळे मात्र शेतकरी, नागरिकांची कामे खोळंबली आहेत. जगताप यांची बदली करावी, अशी संघटनेची मागणी आहे. संप सुरू होऊन दहा दिवस झाले आहे. आपत्ती व निवडणूक वगळता अन्य सर्व कामे बंद आहे. 

राज्यातील तलाठ्यांना समन्वय ठेवण्यासाठी व कामकाजाचे नियोजन करण्यासाठी राज्य तलाठी संघाचा सोशल मीडियावर एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर दहा दिवसांपूर्वी तलाठी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुबल यांनी कामकाजासंदर्भात एक मेसेज पाठवला होता. त्या ग्रुपवर डुबल यांच्या मेसेजला उद्देशून राज्य समन्वयक विभागाचे जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी ‘‘मुर्खासारखे मेसेज टाकू नका,’’ अशी टिप्पणी केली. डुबल हे तलाठ्यांचे नेते आहेत. त्यांच्या मेसेजला उद्देशून जाणीवपूर्वक अवमानकारक टिप्पणी करणारे जगताप कामकाजाबाबत तलाठ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप आहे.

राज्यातील सुमारे साडेबारा हजार तलाठी यात सहभागी झाले आहेत. बदली झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे संघटनेने सांगितले. संप असल्याने आपत्ती व निवडणूक वगळता संगणकीय व इतर सर्व कामे तलाठ्यांनी बंद ठेवली आहेत. सरकारी पातळीवर मात्र दहा दिवस होऊनही हे दखल न घेतल्याने शेतकरी, नागरिकांची मात्र अनेकांची गैरसोय होत आहे.

राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुबल हे तलाठी आणि नागरिक, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात. त्यांच्या मेसेजला उद्देशून जगताप यांनी जाणीवपूर्वक टिप्पणी केली. तलाठ्यांना सतत वेठीस धरणारे जगताप यांची बदली व्हावी यावर आम्ही ठाम आहोत. - डी. जी. भुजबळ, जिल्हाध्यक्ष, तलाठी महासंघ 

महात्मा गांधी योजनेतून मला विहिरीचे प्रकरण करायचे असून, त्यासाठी तलाठी कार्यालयातून फेर काढायचे आहेत. अनेक दिवसांपासून मी कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र संप सुरू असल्याने काम होत नाही.  - बळिराम शिरसाठ, शेतकरी, शिरसाठवाडी, ता. पाथर्डी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com