जळगावात विहीर योजनेचे काम कासवगतीने

जळगावात विहीर योजनेचे काम कासवगतीने
जळगावात विहीर योजनेचे काम कासवगतीने

जळगाव : शासनाच्या प्रोत्साहनातून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. मात्र तिचा लक्ष्यांक पूर्ण करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. या योजनेचे काम मजूरटंचाई, वाळूच्या अडचणी, निधी वितरणातील त्रुटींमळे संथगतीने सुरू असल्याची स्थिती आहे.

दोन वर्षांत योजनेचे काम करायचे आहे. तांत्रिक मंजुरी, कार्यारंभ आदेश यासंबंधी गतीने काम झाले. मागील वित्तीय वर्षात सुमारे अडीच कोटी रुपये निधी मिळाला. यातील कामे अजून पूर्ण झाली नाहीत. या वित्तीय वर्षात (२०१८-१९) पाच कोटी रुपये निधी मिळाला आहे.

मागासवर्गीय संवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अाहे. चाळीसगाव, जामनेर व मुक्ताईनगर भागातून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. २०० विहिरींबाबत कार्यवाही करायची आहे. त्यामध्ये काही जुन्या विहिरींची दुरुस्ती, डागडुजीदेखील केली जाईल. 

विहिरींची नवी कामे अलीकडेच सुरू झाली. वाळूची समस्या, निधी वितरणातील त्रुटी व मजूरटंचाईमुळे कामाला गती नाही. चाळीसगाव, जामनेरमध्ये दुष्काळी स्थिती आहे. विहिरीला पाण्याचा स्रोत न मिळण्याची भीतीही शेतकऱ्यांना अाहे. अशा स्थितीत लक्ष्यांक १०० टक्के पूर्ण करणे प्रशासनाला शक्‍य होणार नसल्याचेही सांगण्यात आले.

यंदाचे वित्तीय वर्ष संपत आले आहे. मान्यतेची कार्यवाही झाली आहे. मागील वर्षातील २० टक्के कामे रखडली आहेत. यातील काही कामांना वीज संयोजन मिळाले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com