‘जलयुक्त'ची कामे कासव गतीने

‘जलयुक्त'ची कामे कासव गतीने
‘जलयुक्त'ची कामे कासव गतीने

जळगाव : खानदेशात जलयुक्त शिवार अभियानासंबंधी चौथ्या टप्प्यातील (२०१८-१९) कामांची गती अपेक्षित नाही. तिसऱ्या टप्प्यातील २० टक्के कामेही विविध तांत्रिक व इतर कारणांमुळे अपूर्ण असल्याची माहिती आहे.

या कामांची गती धुळे जिल्ह्यात बरी, तर जळगाव, नंदुरबारमध्ये कमी आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २१७, नंदुरबारात सुमारे १३७ व धुळ्यातही जवळपास ९१ गावांमध्ये कामे घेतली आहेत. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांत सर्वात कमी गती आहे. मागील महिन्यात जळगाव येथे या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात कामांची गती कमी असल्याचे वरिष्ठांना आढळले. मागील तीन टप्प्यांमधील कोणती कामे अपूर्ण आहेत, याची माहितीदेखील घेण्यात आली. त्यात मागील तीन टप्प्यांमधील कामे वाळू, जागांसंबंधीच्या अडचणी, ठेकेदारांवरील कारवाई आदी कारणांमुळे कामे ठप्प झाली आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.

चौथ्या टप्प्यातील कामांबाबत निधी वितरणाची अडचण हे प्रमुख कारणही समोर आले. त्यात चौथ्या टप्प्यासाठी खानदेशात सुमारे ५० कोटी रुपये निधी आणखी हवा आहे. प्राप्त झालेल्या निधीतून कामे घेतली आहेत. परंतु जेथे निधी अपूर्ण पडला, तेथे कामांची गती संथ आहे. सिमेंट नालाबांध, तलाव दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. कारण मार्चपर्यंत ही कामे व्यवस्थित झाली, तर पुढे पावसाळ्यात त्यांचा उपयोग शिवारासाठी होईल, असे जिल्हा परिषदेचे सदस्य, सरपंचांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग करणाऱ्या कामांतील फेरतपासणी (क्रॉसचेकींग) करावी, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com