‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळ

छगन भुजबळ
छगन भुजबळ

नाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये निकाल समोर आल्यानंतर महाआघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार अशी चिन्हे दिसायला लागल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जे यश मिळताना दिसत आहे ते मोदींचे आहे की ईव्हीएमचे, असा प्रश्न विचारला आहे. यावर त्यांनी ‘ईव्हीएमचा विजय असो’, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

जीएसटी व नोटाबंदीमुळे देशभरातील जनता होरपळली. ग्रामीण भागातही शेतकरी व कर्मचारीवर्गात मोठा असंतोष आहे. त्यामुळे हा निकाल आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, की देशात ईव्हीएम यंत्राबाबत अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविले. या यंत्रातील तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी आजही कायम आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका का होत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरीविरोधी धोरणांमुळे मोठी नाराजी आहे. त्यामुळे भाजपाला मिळालेला हा विजय धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com