दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे अतोनात नुकसान

दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे अतोनात नुकसान
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे अतोनात नुकसान

शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. दरम्यान, या वर्षी तापमानाने उच्चांक गाठल्याने याचा फटका संत्रा उत्पादकांना अधिक बसला. अनेक बागांमधील उभी झाडे वाळली आहेत. परिणामी, काहींना या बागा तोडाव्या लागल्या. दुष्काळाचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना झेलावे लागत आहेत. फळबागा सुकल्यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून संगोपन केलेल्या बागा शेतकऱ्यांना तोडाव्या लागत आहेत. त्यामुळे यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेलूबाजार परिसर हा बागायती क्षेत्र असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने शेकडो हेक्टरवर फळबागा फुलविल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. पावसाअभावी खळखळ वाहणारे नदीनाले कोरडे पडले. पावसाच्या पाण्याचा पाहिजे तसा जमिनीत निचरा झाला नसल्याने भूगर्भातील पातळी झपाट्याने खोल गेली. कधी न आटणाऱ्या सिंचन विहिरींनी या वर्षी तळ गाठला होता. त्यात यावर्षी तापमानाने उच्चांक गाठल्याने बागांना पाण्याची मोठी गरज होती. परंतु शेतकऱ्यांना पाणी देता आले नाही. परिणामी, परिसरातील लिंबू, संत्रा, मोसंबी, आंबा, पेरू, सीताफळ या बागा सुकल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com