पीकविम्याबाबत कोणाशी संपर्क साधायचा? शेतकऱ्यांचा सवाल

पीक विमा
पीक विमा

नगर: सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने आदेश दिले आहेत. पीकविमा भरलेला आहे त्यांनी विमा कंपनीशी संपर्क करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र नेमका कोणाशी संपर्क करायचा याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.  विशेष म्हणजे प्रशासनाने कृषी विभागाशी संपर्क करावा असे सांगितले असले तरी, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करण्याबाबत माहिती नसल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत अधिक माहिती नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे, त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. विमा कंपनीशी संपर्क साधताना अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा असे प्रशासनाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहेत.. राज्यभरातील जवळपास सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे ते शेतकरी पीकविमा कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना, अजूनही अनेक शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनीशी संपर्क झालेला नाही. अनेक ठिकाणी कोणाशी संपर्क करायचा याबाबत संपर्क क्रमांकही उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ‘आम्ही कोणाशी बोलायचे’ असे विचारत आहेत. विचार करणारी बाब अशी की अनेक कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही विमा कंपनीच्या कोणता प्रतिनिधीशी संपर्क करायचा याची माहिती नाही. त्यामुळे तेही शेतकऱ्यांना माहिती देऊ शकत नसल्याने मोठा अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com