पुरंदरला पावसामुळे होतेय फुलांचे नुकसान

पावसामुळे फुलांचे नुकसान
पावसामुळे फुलांचे नुकसान

माळशिरस, जि. पुणे  : पुरंदरच्या पूर्व भागातील माळशिरस, पोंढे, टेकवडी परिसरात मागील आठवड्यापासून दररोज होत असलेल्या पावसामुळे फुले सडू लागली आहेत. 

पुरंदरच्या पूर्व भागातील माळशिरस, पोंढे, टेकवडी ही गावे आणि दौंड तालुक्‍यांतील यवत परिसरात मोठ्या प्रमाणात फूलशेती केली जाते. साधारणतः गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा हा कालावधी फूल उत्पादकांसाठी महत्त्वाचा हंगाम असतो. नवरात्र उत्सवासाठी फूल उत्पादक फुले राखून ठेवतात. या वर्षीही फूल उत्पादकांनी नवरात्रोत्सवासाठी फुलांचे फड राखून ठेवले होते.

मात्र, मागील आठवड्यापासून दररोज या परिसरात पाऊस होत असल्याने फुले सडू लागली आहेत. त्याचप्रमाणे झाडेही मोडून पडू लागली आहेत. वाकलेल्या फांद्यांची फुले मातीने भरली आहेत. त्यामुळे फूल उत्पादक चिंतेत असून, हंगामावर पाणी पडते की काय? असे त्यांना वाटू लागले आहे. नवरात्रात पावसाने उघडीप न दिल्यास फूल उत्पादकांचा हा महत्त्वाचा हंगाम वाया जाणार आहे. याबाबत फूल उत्पादक पंडित दोरगे व अण्णा शितोळे म्हणाले, की पावसाने फूलशेती अडचणीत आली असून, पाऊस न उघडल्यास फूल उत्पादक अडचणीत येऊ शकतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com