कुटार खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वर्धा  ः पाण्यासोबतच जिल्ह्यात चाराटंचाई देखील गंभीर झाली आहे. त्यामुळेच बाजारात चाऱ्याच्या दरात तेजी आली असून, व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन गहू, तूर आणि सोयाबीन कुटाराची मागणी करीत आहेत. हे कुटार क्‍विंटलच्या नाही, तर एकराच्या हिशोबाने विकत घेतले जात असल्याचे चित्र आहे. 

पावसाअभावी शासनाने जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. मात्र जिल्ह्यात चाऱ्यांची टंचाई निर्माण झाल्याने पशुपालकांची अडचण झाली आहे. त्यांना जनावरांसाठी चढ्या दराने चारा खरेदी करावा लागत आहे. याच संधीचा फायदा घेण्याकरिता चाऱ्याचे अनेक व्यापारी गावे धुंडाळत आहेत. हे व्यापारी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या शेतात असलेल्या हरभरा, गहू आणि सोयाबीनच्या कुटारची खरेदी करीत आहेत. शेतकरीदेखील गरजेएवढे कुटार घरी ठेवून इतर कुटार विकण्याचा निर्णय घेत आहेत.

सध्या हरभरा, गहू आणि सोयाबीनचे कुटार शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध प्रलोभनेदेखील दिली जात आहेत. चार ते पाच एकरांतील सोयाबीन, हरभरा आणि गव्हाचे कुटार एकत्रित घेण्यासाठी १५ ते १८ हजार रुपये देण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात चाराटंचाईची झळ  तीव्र होण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com