सोलापूर : देशातून माॅन्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये नाशिक, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल १३ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे सुमारे आठ हजार ७९० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या पंचनाम्याचे अहवाल मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांकडे प्राप्त झाल्यानंतर मदतीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केंद्रीय पथकांकडून केली जाणार आहे. त्यासाठी किमान तीन पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ मधून भरपाई दिली जाणार आहे. तत्पूर्वी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह अन्य भागात पुरामुळे झालेल्या भरपाईची रक्कमही त्याचवेळी दिली जाईल, असा अंदाज राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, दिवाळी सुट्ट्यांमुळे पंचनाम्याला विलंब होत असून शेतकऱ्यांना मदतीसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागेल, असेही सांगण्यात आले. ठळक बाबी...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.