अकोला येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अकोला येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
अकोला येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अकोला  ः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, वीजबिल मुक्ती मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी अकोला जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, डॉ. नीलेश पाटील, धनजंय मिश्रा, विलास ताथोड यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.   संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. यात म्हटले, की राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता पीककर्ज तातडीने रद्द करून नवीन पिकासाठी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणारे सरकारी निर्बंध रद्द करून तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे. कापूस, वांगी, मोहरी, मका, ऊस, भात, अशा पिकांच्या जीएम बियाण्यांना परवानगी द्यावी, शेतमालाच्या किमती कमी ठेवण्यासाठी नेहमीच सरकार हस्तक्षेप करते. राज्यात असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्दकरून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्वातंत्र्य देण्यात यावे व आंतरराष्ट्रीय व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमचा थांबवावा, साप चावल्यामुळे शेतकरी मृत झाल्यास कुटुंबाला मदत मिळावी, वान प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी राखीव ठेवावे, या पाण्यावर इतर आरक्षण करू नये, महामार्ग तसेच सरकारी प्रकल्पांमध्ये जाणाऱ्या जमिनींपोटी शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात शेतकरी नेते मनोज तायडे, निळकंठराव देशमुख, विनोद देशमुख, शंकर कवर, सुरेश जोगळे, विजय देशमुख, गजानन ढोकणे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com