सांगली : डाळिंब नुकसानीचा विमा किंवा भरपाई मिळणार

शासनाचा स्पष्ट अध्यादेश असून डाळिंब उत्पादक शेतकरी विमा किंवा नुकसान भरपाईपैकी एकालाच पात्र होतील. - राहुल जितकर, कृषी अधिकारी
डाळींब नुकसान
डाळींब नुकसान

आटपाडी, जि. सांगली ः अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसह डाळिंबाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र नुकसानभरपाई किंवा विमा या पैकी एकच लाभ मिळण्याबाबत शासनाचे अध्यादेश आल्यामुळे एकाच नुकसानभरपाईसाठी शेतकरी पात्र होणार तर एकापासून वंचित राहणार आहेत. यामुळे सारेच संभ्रमात पडले आहेत.  मृग बहरात डाळिंब हंगाम मोठ्या प्रमाणात शेतकरी धरतात. या बहुतांश बागांचा विमा उतरवलेला आहे. या बागांचे अतिपावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये कळी न निघणे, सेटिंग न होणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे क्षमतेच्या तुलनेत पन्नास टक्केही फळधारणा झाली नाही. त्यात ऑक्‍टोबरमध्ये पावसाने कहरच केला. त्यामुळे फळावरती डाग पडणे, काळी पडणे, कुजणे असे नुकसान झाले आहे.  विमा उतरवल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना विमा मिळेल अशी आशा आहे. शासनानेही शेतकऱ्यांची ओरड सूरू झाल्यावर नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र या अध्यादेशात मेख मारली आहे. पंचनामे सरसकट करा मात्र शेतकरी विमा किंवा नुकसानभरपाई या एकालाच पात्र राहणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरल्यामुळे त्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना दोन्हीपैकी एकच लाभ मिळाले आहेत. यामुळे शेतकरी गोंधळात पडले असून, शासन शेतकऱ्यांना फसवत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.  विमा खासगी कंपनीकडून मिळतो तर नुकसानभरपाई शासन देते. शासन विम्याचा नव्वद टक्के हप्ता रक्कम भरते या नावाखाली विमाधारकांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com