आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून जनआशीर्वाद यात्रा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेला जळगावातून येत्या गुरुवारी (ता. १८) सुरवात होणार असल्याचे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (ता. १५) सांगितले.  

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोचण्याचा मानस असल्याचही श्री. सरदेसाई यांनी सांगितले. यादरम्यान ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम, कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १८ जुलैला जळगाव येथून जनआशीर्वाद यात्रा सुरू होईल. त्यानंतर १९ तारखेला धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात, तर २२ तारखेला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती श्री. सरदेसाई यांनी दिली.

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदित्य ठाकरे पोचतील. २२ जुलैला पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढील टप्प्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे श्री. सरदेसाई यांनी सांगितले. एकंदरीत सुमारे चार हजार किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. लोकसभेत ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचे मन वळवण्यासाठी या यात्रेत प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com