पावसाने जालन्यातील डाळिंब बागांना फटका

पावसामुळे डाळिंब बागांना फटका बसला आहे
पावसामुळे डाळिंब बागांना फटका बसला आहे

जालना  : केवळ जालनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील डाळिंब उत्पादकांना ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फूलगळ, फळगळ, फळकूज, फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. अति पावसामुळे डाळिंब उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून डाळिंब उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाने केली आहे.  

या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना शनिवारी (ता. २) निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की राज्यात यापूर्वी दुष्काळ होता. डाळिंब बागांना पाणी न मिळाल्याने काही बागा वाळून गेल्या. त्याचे पंचनामे अद्याप झालेले नाही. हे संकट संपते न संपते तोच ऑक्‍टोबर महिन्यात अतिपावसाने डाळिंब बागांची मोठी हानी झाली. जवळपास ७५ टक्‍के डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे डाळिंब बागांचा ताण मोडला. त्यामुळे छाटणीची समस्या निर्माण झाली. ज्या ठिकाणी छाटणी झाली तेथे फूलगळ मोठ्या प्रमाणात होते आहे. ज्या ठिकाणी फळ आले तेथे फळकूज, फळ तडकण्याची समस्या वाढली आहे. पावसामुळे फळावर तेलकट डाग रोगाचे प्रमाणही वाढले आहे.

नाशिक, परभणी, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, सातारा, नगर, पूणे, सोलापूर, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांत डळिंब पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. डाळिंब उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता नुकसानीचे पंचनामे तत्काळ व्हावे, त्यांची कर्जमाफी व्हावी, त्यांना नुकसानभरपाई मिळावी व तशा सूचना सबंधितांना देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक, संशोधन संघाने केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com