विमा कंपनीकडे ३५० शेतकऱ्यांचा हप्ता दिलाच नाही

मी साडे सहा एकर क्षेत्राचा २०१८ च्या खरीप हंगामात पातुर्डा येथील सीएससी केंद्रावर नगदी स्वरूपात पीकविमा भरणा केला. केंद्रचालकाने पावती दिल्याने भरणा झाला असे वाटले. परंतु, भरपाईमध्ये माझ्यासह बरेच शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. म्हणून आम्ही सदर केंद्र चालकाला विचारणा करण्यासाठी गेलो असता त्या केंद्रचालकाने योग्य माहिती दिली नाही. यात संशय आल्याने आम्ही कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याकडे चौकशी केली. त्यात आम्ही केंद्र चालकाला पैसे देऊनही कंपनी कडे आमचे पैसे जमा झाले नसल्याचे उघड झाले. आता काय करावे हे सुचत नाही. पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे. प्रशासनाने न्याय द्यावा ही अपेक्षा आहे. - नीलेश डिगाबर इंगळे, शेतकरी टाकळी पंच ता. संग्रामपूर जि. बुलडाणा
पीक विमा पावती
पीक विमा पावती

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यातील टाकळी पंच येथील सुमारे ३५७ शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात काढलेला पीकविमा, सीएससी केंद्र चालकाने प्रिमियम कंपनीकडे जमा न केल्याने भेटलाच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याच तालुक्यातील पातुर्डा येथील हे सीएससी केंद्र असून शेतकरी व शेतकरी संघटनेने पोलिसांत फिर्याद देत कारवाईची तसेच नुकसानभरपाईची मागणी केली आहे.  सन २०१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत पिकांचा विमा काढला होता. मात्र, त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यांनी चौकशी सुरू केली असता त्यांना आपण भरलेला प्रिमियम विमा कंपनीकडे पोचलाच नसल्याचे समजले. या प्रकरणात सीएससी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांकडून घेतलेली विम्याची रक्कम कंपनीकडे भरलेली नाही. ही रक्कम लाखो रुपयांची असून त्याचा स्पष्ट आकडा समोर आलेला नाही.   शेतकरी विमा भरला त्या वेळी त्यांना दिलेली पावतीसुद्धा ही बनावट असल्याची शंका घेतली जात आहे. या भागात हजारो शेतकरी २०१८ च्या हंगामात पीकविमा काढूनही भरपाईपासून वंचित राहलेले आहेत. टाकळी पंच या एकाच गावातील शेतकऱ्यांची संख्या साडेतीनशेपेक्षा अधिक आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या सीएससी संचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बाणाईत यांनी केली आहे. प्रतिक्रिया संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील संबंधित केंद्र चालकाने शेतकऱ्यांना पीकविमा भरणा झाल्याची पावती बनावट तर दिली नाही ना याची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण, ज्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली त्या पावतीमध्ये आणि वंचित असलेल्या या शेतकऱ्यांजवळील पावतीमध्ये बरीच तफावत दिसत आहे. सदर वेबसाइटवर छेडसाड करून अशा बनावट पावत्या  बनविल्या असाव्यात अशी शंका आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करणे गरजेचे झालेले आहे.           - रमेश बाणाईत, जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com