नाशिक जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान

भाताचे पीक पूर्ण नुकसान झाले आहे. पाणी वरून वाहत असल्याने कापलेला भात पाण्याखाली आहे. त्यामुळे चालू वर्षी हा हंगाम वाया जाणार. - संजय सहाणे, भात उत्पादक शेतकरी, साकुर, ता. इगतपुरी
भात नुकसान
भात नुकसान

नाशिक : भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी व पेठ तालुक्यात पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेले व कापून ठेवलेल्या भातपिकाचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.  मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने भातपिकाला दणका दिला. यंदा चांगला पाऊस असल्याने चांगले उत्पन्न येईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा पावसामुळे हिरमोड झाला. ऐन हंगामात सोंगणीसाठी आलेला भात आडवा झाला; तर सोंगून ठेवलेले पीक पावसामुळे खराब झाले. काही ठिकाणी पावसाने भात भिजला असून, असाच पाऊस सुरू असला तर भातकापणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. पावसामुळे उभ्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पेठ तालुक्यात बहुतांश शेतकरी हे खरीप पिकावर अवलंबून असतात. त्यात अशाप्रकारे नुकसान झाल्यास वर्षभराची कुटुंबाची गुजराण कशी करावी, असा प्रश्न आहे. काही शेतकऱ्यांनी भाताची कापणी केली; तर काहींचा भात अजून शेतातच असल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.  प्रतिक्रिया ४० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत केलेली मेहनत व खर्च वाया गेला. चालू वर्षीच्या हंगामात परतीचा पाऊस धोक्याचा ठरला आहे. नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम असून नसल्यासारखा आहे.  - संपत मुसळे, भात उत्पादक, नांदूर वैद्य, ता. इगतपुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com