पिकांचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करा ः डॉ. बोंडे

पिकांचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करा ः डॉ. बोंडे
पिकांचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करा ः डॉ. बोंडे

अमरावती  ः ‘‘बदलत्या हवामानाच्या काळात पिकाचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन शिकवीत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी संजीवनी उपक्रम महत्त्वपूर्ण असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,’’ असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. येथील कांचन रिसॉर्ट येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित कृषिमित्र आणि कृषिताई यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, विजय खरोटे यांची या वेळी उपस्थिती होती.  कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, ‘सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलांचा वनस्पती, सजीवांवर परिणाम होतो. शेतीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अशा बदलत्या हवामानासोबत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी संजीवनी योजना उपयुक्‍त ठरेल. विविध योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसह निसर्ग संवर्धनाचे मूल्य रुजविण्याचे कामही त्याद्वारे होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी विविध योजनांसह विविध कौशल्यही शेतकरी बांधवांमध्ये रुजविण्याची गरज आहे.’ शेतीमालावर प्रक्रिया करून तो विकल्यास चांगला भाव मिळतो. त्यासाठी व्यावसायिक मूल्यांचे प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com