बावनथडी प्रकल्पात उरला केवळ मृतसाठा

बावनथडी प्रकल्पात उरला केवळ मृतसाठा
बावनथडी प्रकल्पात उरला केवळ मृतसाठा

भंडारा ः हमखास पावसाचे जिल्हे अशी ओळख असलेल्या भंडाऱ्यातच एैन पावसाळ्यात प्रकल्प कोरडे पडले आहेत. आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक असून सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्‍के इतकाच आहे.  पूर्व विदर्भातील धान उत्पादक भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हे जिल्हे शाश्‍वत पावसाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. परंतु, गेल्याकाही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा फटका या जिल्ह्यांना देखील बसला आहे. त्यामुळेच पावसाळ्याला दीड महिना लोटला असला तरी या भागातील प्रकल्पांमध्ये अद्याप अपेक्षीत जलसाठा होऊ शकला नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील सीतेकसा गावाजवळ बावनथडी नदीवर राजीव सागर प्रकल्प उभारण्यात आला आहे. ३५ वर्षांपूर्वी या प्रकल्पावर दोन्ही राज्यांनी एक हजार ८३८ कोटी रुपये खर्च केले. त्यात महाराष्ट्राचा वाटा ८३६ कोटी रुपयांचा आहे. दोन्ही राज्यांनी आपआपल्या क्षेत्रात कालवे, वितरकांची कामे पूर्ण केली. प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. अनेक अडसर या प्रकल्पाच्या उभारणीत आले होते. त्यावर मात करीत हा प्रकल्प पूर्ण झाला. तुमसर तालुक्‍यासाठी हा प्रकल्प वरदान आहे. परंतु, यावर्षी प्रकल्पाचा साठा निरंक असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. बावनथडी नदीदेखील अद्याप कोरडीच आहे. अशीच स्थिती राहिल्यास रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त ठरणार आहे.

प्रकल्पात केवळ मृतसाठा बावनथडी प्रकल्पात उपयुक्‍त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्‍के आहे. नियमानुसार मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. त्यामुळे भविष्यातील संकटाची चाहूल आत्तापासून शेतकऱ्यांना लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com