राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय घ्यावा : देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय घ्यावा : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय घ्यावा : देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते. तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला तातडीची मदत करण्याचा विचार करावा लागतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी श्री. फडणवीस बुधवारी (ता. १) नागपुरात आले. त्या वेळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.  श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘जेव्हा राज्याचे प्रमुख किंवा मंत्री नैसर्गिक आपत्तीच्या पाहणीसाठी जातात, तेव्हा प्रशासन वेगाने कामाला लागते. मी आणि प्रवीण दरेकर उद्यापासून वाशीम जिल्ह्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करतोय. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांत जाणार आहोत आणि परिस्थिती पाहून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ 

सरकारच्या घोषणा हवेत विरल्या...  यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. जेवढ्या आपत्ती आल्या त्या संदर्भातल्या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. अगदी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ सर्व आपत्तीच्या वेळेला सरकारने केलेल्या घोषणा पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com