सध्याच्या स्थितीमध्ये अनेक द्राक्ष विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येते. काही ठिकाणी पाऊस पडल्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानही कमी झालेले दिसून येते. अशा वातावरणामध्ये आर्द्रता, तापमान आणि ढगाळ स्थिती अशा तिन्ही बाबी अनुकूल असल्यामुळे मणी सेंटिंगनंतरच्या अवस्थतमध्ये भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. मणी सेंटिंग ते मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये या रोगांची समस्या जास्त प्रमाणात आहे. बागेमध्ये दाट कॅनोपी असलेल्या वेलीवर बाहेरून रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे जाणवत नाही. काही परिस्थिती पूर्ण कॅनोपी रोगमुक्त असली तरी कॅनोपीच्या आतील भागातील द्राक्षघडांच्या काही मण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बाहेरून केलेली फवारणी कॅनोपीच्या आतपर्यंत पोचत नसल्याने रोगाचे नियंत्रण मिळत नसल्याची स्थिती असावी. अशा भागातील द्राक्षघड लवकर खराब होत असल्याचे दिसून येईल. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेलीवरील कॅनोपी मोकळी असणे गरजेचे आहे. असे केल्यास एकतर भुरी रोगाच्या प्रादुर्भावास जबाबदार वातावरण तयार होणार नाही. फवारणी केल्यानंतर व्यवस्थितरीत्या कव्हरेज मिळेल.
ः डॉ. सुजय साहा, ०२०-२६९५६०३२ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.