द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत चालली असून, वाढत्या खर्चासोबत उत्पादनात घट होत आहे. वातावरण बदलाच्या काळात शाश्वत निर्यातक्षम उत्पादन देणाऱ्या द्राक्ष वाणांची गरज बागायतदार सातत्याने व्यक्त करत. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कॅलिफोर्निया येथील ‘आरा-१५’ हे वाण उपलब्ध केले असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. रावळगाव (ता. मालेगाव जि. नाशिक) येथील लागवडीमध्ये एका वर्षात दुबार उत्पादन घेण्याचा प्रयोग नुकताच यशस्वी झाला आहे. सलग तिसऱ्यांदा गोडी बहार छाटणी घेऊन जोरदार घडनिर्मिती झाली. सध्याच्या द्राक्ष शेतीसमोर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च या प्रमुख अडचणी आहेत. या दोन्ही घटकांमुळे परिणामी जोखीम वाढत असताना उत्पन्न घटत आहे. बदलणाऱ्या वातावरणात कमी खर्चात शाश्वत उत्पादन देणाऱ्या निर्यातक्षम द्राक्ष वाणांची गरज बागायतदारांना भासत होती. शेतकऱ्यांची कंपनी म्हणून लौकिक असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने यासाठी पुढाकार घेतला. अधिक उत्पादकता, कमी उत्पादन खर्च व निर्यातक्षम अशी वैशिष्ट्ये असलेला ‘आरा-१५’ हा कॅलिफोर्निया येथील वाण भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. या वाणाची ‘लागवड ते विक्री’ हे सर्व अधिकार प्राप्त केले. जिल्ह्यामध्ये पूर्ण शास्त्रीय प्रक्रिया (प्लॅन्ट क्वॉरन्टाइन ) व नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांकडे लागवडी झालेल्या आहेत. भारतातील ‘आरा-१५’ लागवडीचे टप्पे : २०१५...वाण भारतात आणण्यासाठीच्या प्रक्रिया सुरु २०१६...सह्याद्री कंपनीच्या माध्यमातून वाण भारतात पहिल्यांदा उपलब्ध २०१७-१८...पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यातील रावळगाव (ता.मालेगाव) येथे लागवड नुकसान झाल्याने दुबार गोडी बहार छाटणीचा निर्णय : सन २०१८ च्या दुष्काळी परिस्थितीत २९ एकरवर लागवड करण्यात आली. मात्र, पुढे २०१९ साली कसमादे भागात अतिवृष्टी झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अखेरीस छाटणी झाली असताना पावसामुळे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे ६० ते ७० दिवस बागेत पाणी साचून राहिल्याने रोग नियंत्रणासाठी फवारण्या व हंगामनिहाय कामे करताना अडचणी आल्या. परिणामी बागेत वेलीवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाले. या वाणास फळधारणक्षमता अधिक आहे. त्यामुळे वर्षातून दुसऱ्यांदा छाटणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीत द्राक्ष पीक हातातून गेल्यास बागेस विश्रांती दिल्यानंतर ‘आरा १५’ वाणाची पुन्हा छाटणी करून उत्पादन घेणे शक्य होते. डिसेंबर-२०१९ मध्ये एकदा उत्पादन घेतल्यानंतर आता पुन्हा जून-२०२०मध्ये दुसरे उत्पादन तेही अपेक्षित गुणवत्तेप्रमाणे मिळाले आहे. ‘आरा-१५’ उत्पादनातील घटनाक्रम :
कामकाजाचे नियोजन :
व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे :
दुबार हंगामातील प्रमुख निरीक्षणे:
तुलनात्मक फळधारण क्षमता (टक्के)
दुबार हंगामातील उत्पादनातील ठळक बाबी :
वाणाच्या सकारात्मक बाजू:
‘आरा-१५’ द्राक्षाची वैशिष्ट्ये :
नैसर्गिक आपत्तीत प्रतिकारक्षम वाणामुळे दुबार हंगाम झाला शक्य
आरा- १५ वाण लागवडीची सद्यस्थिती ः
पडीक जमिनीवर खुलले द्राक्ष शेतीचे प्रयोग : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे पडीक क्षेत्र सह्याद्री फार्म्सने भाडेतत्वावर घेतले आहे. या ठिकाणी द्राक्ष शेतीतील नव्या वाणांच्या लागवडीसह अनेक प्रयोग केले जात आहेत. बदलत्या द्राक्ष शेतीत टिकाव धरण्यासाठी सह्याद्रीने नवीन ११ वाण उपलब्ध केले आहेत. पुढील दोन वर्षात त्यांचेही निष्कर्ष तपासले जात आहेत. हिरवा वाण... आरा३०, आरा३३, आरा ८A-१९+४ लाल वाण... आरा २९, आरा १०A-३+३, आरा ३०A-११+३, आरा ७९B-४४+१, आरा २८-८४+२ काळा वाण... आरा ३२, आरा २४A-१५+३
बदलणाऱ्या प्रतिकूल वातावरणात अनुकूल व निर्यातक्षम वाणांची गरज आहे. ‘आरा १५’ वाणाच्या लागवडीनंतर मागील तीन प्रयोगात जी गुण वैशिष्ट्ये समोर आली आहेत, त्यातून आरा वाण बदलत्या द्राक्ष शेतीसाठी वरदान ठरणार असल्याचा अंदाज येत आहे. पुढील पाच वर्षात द्राक्ष शेती नक्कीच बदललेली असेल. -विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी, जि.नाशिक.
संपर्क : सचिन वाळूंज, ९४२२१७ ८९८६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.