माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य वनस्पती वेगाने वाढून लावलेली रोपे वाढत नसल्याचे जाणवले असेल. त्या वेळी ही अन्य वनस्पती काढून टाकून तणनिर्मूलनाला प्रारंभ झाला. हाताने तण उपटून टाकणे पासून सुरू झालेला हा प्रवास आज तणनाशकांच्या अपरिमित वापरापर्यंत येऊन पोचला आहे. लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबी आपण पाहत आहोत. तणांचा प्रसार सर्वत्र म्हणजे रस्त्यांच्या कडा, पडीक जमिनी या बरोबरच प्रामुख्याने शेतीमध्ये होत असतो. अन्य ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षा पिकामध्य वाढणाऱ्या तणांचा मानवाला सर्वात जास्त त्रास होतो. लेखकाने पिकांच्या विविध कारणांनी होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण मांडले असून, त्यात तणामुळे सर्वाधिक ४५ टक्के नुकसान होते. त्यानंतर कीडीमुळे ३० टक्के, रोगांमुळे २० टक्के व अन्य कारणांमुळे ५ टक्के असे नुकसान होते. म्हणजेच शेतीतील उत्पादन वाढवायचे असेल, तर तण विनाशाला जास्त महत्त्व आहे. हरित क्रांती पूर्वीचे हे सर्वेक्षण आहे. (आज तणांच्या तुलनेत रोगकिडीमुळे होणारे नुकसान जास्त असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तण विज्ञान मागे पडत गेले असावे. शास्त्रीय जगतामध्ये वनस्पती विकृतीशास्त्र आणि कीटकशास्त्राला सर्वाधिक महत्त्व आले असावे.) तणे ही पिकाच्या तुलनेमध्ये अधिक काटक असतात. अवर्षणात ती जास्त काळ तग धरू शकतात. तसेच पिकाच्या तुलनेमध्ये अधिक अन्न फस्त करू शकतात. तणे पिकाबरोबर अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाश याबाबत स्पर्धा करतात. मुक्तपणे वाढू दिल्यास पिकाच्या वर वाढून पिकाचा सूर्यप्रकाश अडवू शकतात. यामुळे पिकाला फुटवे येणे, फांद्याची वाढ होणे यावर परिणाम होतो. तणामुळे होणारे पिकाचे नुकसान हे तणांच्या प्रजाती, तण वाढीचा कालावधी व अनुकूल प्रतिकूल हवामान इत्यादी घटकामुळे कमी जास्त होते.
१. तणाने भरलेल्या जमिनीची किंमत कमी होते. २. तणांशी स्पर्धा करू शकणारे पिकाचे वाण कमी. ३. पीक उत्पादनाची प्रतवारी घसरते. ४. मजुरांची कार्यक्षमता घटते. ५. काही तणांची माणसाला ॲलर्जी. तणनिर्मूलनाच्या पद्धतीचे कालमापन ः
२, ४-डी चा वापर ः
भारतातील स्थिती ः भारतात चहा उद्योगात तणनाशकांनी प्रथम प्रवेश केला. लेखकाने वर नमूद केलेली परिस्थिती कदाचित तिकडे असावी. मी १९७० साली शेती करण्यास प्रारंभ केला, त्या वेळी मला तणनाशकासंबंधी काहीही माहिती नव्हती. बहुतेक शेतकऱ्यांकडे रसायने फवारणीची साधने नव्हती. ७०-७५ काळात मी क्वचित २-४ डी चा वापर केला असेल. १९८० च्या सुमारास अट्राझीन हे निवडक तणनाशक ऊस शेतीसाठी भारतीय बाजारात आले. तणे व पीक उगवण्यापूर्वी हे तणनाशक मारल्याने रानात फक्त उसाचीच उगवण होई. बाकी काहीच उगवत नसे. त्याकाळी हे एक आश्चर्य मानण्यासारखे होते. असे झाले तर भांगलणीचे काम बंद होऊन शेतमजुरावर उपासमारीची वेळ येईल असे वाटत होते. केवळ मजुरावर अवलंबून असणारे शेतकरीच याचा वापर करतील. घरचे मजूर असणारे शेतकरी यावर पैसा खर्च करणार नाहीत असे सुरवातीला वाटे. काही काळानंतर साखर कारखान्यांनी ५० टक्के सवलतीच्या दरात तणनाशके उपलब्ध करून दिल्यानंतर तणनाशकांच्या वापराने प्रचंड वेग घेतला. २-४ वर्षांनंतर संपूर्ण तणांचे नियंत्रण होईना. काही तणांचे नियंत्रण झाले. परंतु, काही नव्या तणांची वाढ वेगाने होऊ लागली. आता तणनाशकांचा वापरही होत राहिला. भांगलणीचे कामही सुरू राहिले. असे असले तरीही तणनाशकाचे महत्त्व पुढे वाढतच गेले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.