भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश ढगाळ राहून सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांकरिता जिल्हानिहाय हवामान अंदाज खालील तक्त्यात देण्यात आलेला आहे. विस्तारित अंदाजानुसार, मराठवाड्यात १२ ते १८ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी ८ ते १२ जुलै या काळामध्ये वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३० ते ३२ अंश आणि किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत राहू शकते. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेला अंदाज व सध्याची पीकपरिस्थिती यानुसार मराठवाड्यातील प्रमुख पिके व पशुधनाकरिता पीकनिहाय कृषी हवामान सल्ला खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. कापूस
सोयाबीन
तूर
ऊस काही शेतकऱ्यांकडे जानेवारी महिन्यात लागवड केलेला पिवळा पडण्याची समस्या दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे पावसाने उघडीप दिल्यास फवारणी करावी. मूग व उडीद वेळेवर पेरणी केलेल्या मूग व उडीद पिकात हलकी कोळपणी करावी. पुढील काळात मूग व उडीद पिकाची पेरणी करू नये. भुईमूग वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात हलकी कोळपणी करावी. पुढील काळात भुईमूग पिकाची पेरणी करू नये. मका वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात हलकी कोळपणी करावी. अद्याप पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (७५ मिमी. पेक्षा जास्त) झाल्यानंतर मका पिकाची पेरणी करण्यास हरकत नाही. भाजीपाला रोपवाटिकेत गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपातील तणांचे व्यवस्थापन करावे. मागील काही दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे रोपवाटिकेतील रोपांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडुनिंबआधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. पुनर्लागवड झालेल्या भाजीपाला पिकातील तणांचे व्यवस्थापन करावे. पशुधन व्यवस्थापन
कृषी अभियांत्रिकी खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात सरी काढावी. त्यामुळे पावसाचे पाणी सरीत साठून जमिनीत मुरेल. कापूस, तूर इ. जास्त अंतरावरील पिकांमध्ये एक आड एक तास; तर सोयाबीन, मूग, उडीद इ. कमी अंतरावरील पिकांमध्ये चार ओळींनंतर एक सरी काढावी. पेरणीयोग्य पाऊस व पेरणी मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत, जालना जिल्ह्यातील जालना, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, लोहारा, परांडा, तुळजापूर, उमरगा आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड अशा भागांमध्ये पेरणीयोग्य (७५ मि.मी.पेक्षा जास्त) पाऊस होताच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी. १५ जुलैपर्यंत सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, सूर्यफूल, तीळ, कारळे इ. पिकांची पेरणी करता येते. ७ जुलैनंतर मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग या पिकांची पेरणी करू नये. डॉ. कैलास डाखोरे (प्रकल्प समन्वयक) ः ९४०९५४८२०२ प्रमोद शिंदे (संशोधन सहयोगी) ः ७५८८५६६६१५ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.